अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीयामागील(Akshaya Tritiya)इतिहास,आध्यात्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेणे

अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे.हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवीची) जयंती, परशुराम जयंती, आणि बसवेश्वर महाराज जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसांचे भाग्य वाढते

धार्मिक आचार : 

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात.असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.

महत्त्व :

या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय अविनाशी होते.

सांस्कृतिक महत्त्व : 

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ ,किंवा भिजवलेले हरबरे आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

आख्यायिका :

अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग’ असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं’ तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी’ ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता.दुसऱ्या मान्यतेनुसार प्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची ही पूजा केली जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाक घर पवित्र होते आणि अन्नाची ही चव वाढते. महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. महाभारतातील युधिष्ठिरला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब व भूकेल्या लोकांना अन्नदान करीत असे याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. अक्षय तृतीये मागे हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे श्रीकृष्ण अवतारा त्याचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मूठभर पोहे होते ते सुद्धा माने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले आपला मित्र व सर्वांचे हृदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो. 

सांस्कृतिक आचार : 

या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे.सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान.ब्राह्मण भोजन घालणे.या दिवशी सातूचे महत्त्व असून ते नक्की खाणे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, वस्त्र, शस्त्र, दागिने, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.या दिवशी नवीन वास्तुत गृहप्रवेश करणे नवीन वस्तू खरेदी करणे व सोने  खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात या दिवशी केलेल्या शुभकार्याचे श्रेष्ठ फळ मिळते अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते.

 या दिवशी केलेल्या दारातून पुष्कळ पुण्य मिळत पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेला पाप नेऊन होतं कमी होतं आणि त्याचा पुण्य साठा वाढतो एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला दान करायला हवा ते सुद्धा अनेक प्रकार आहेत . पहिला प्रकार आहे धनाच दान करणे म्हणजे तुम्ही कोणाला आर्थिक मदत करू शकता आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळ्या असतात तुम्ही एखाद्या गरिबाला दान करू शकता किंवा असे एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करते  आहे. अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करते  आहे अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता. याच दिवशी कुलदेवतेचा जप करावा कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मन ठेवावं दिवसभर उपासना साधना आणि ध्यान करावं त्यामुळे मनाचे दान होत. अर्थात मनाला दिवसभर ईश्वरचरणी लावावं आणखीन एक प्रकारचं दान अक्षय तृतीयेला आवर्जून करावं ते म्हणजे उदक कुंभाचे दान करा.पण उद्या कुटुंबदान करणे म्हणजे काय तर मातीचा एक छोटा माठ पाण्याने भरलेला माठ दान करणे त्यामध्ये सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पितृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळेल पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते इतरांसाठी या प्रकारचे दान केलं का? तर या गोष्टीवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल की एप्रिलचा उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे उष्माघाताने लोक मरतात. मग अशावेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पाणपोळीची सोय करा त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी सोय करा प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठी पाणी ठेवा या प्रकारच्या दानाचा सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय मिळेल याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकतात त्याचबरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्यही दान करू शकतात.

भारतातील विविध प्रदेशातील अक्षय्य तृतीयेच्या परंपरा आणि चालीरीती

१)महाराष्ट्र – महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

२)उत्तर भारत – या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.

३)ओरिसा – या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही.प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.देवाच्या नौका विहारासाठी पाच बोटी यानिमित्ताने सुशोभित केल्या जातात.

४) दक्षिण भारत – महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.

५)पश्चिम बंगाल – या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.

६)राजस्थान – राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.

अन्य धर्मात

१)बौद्ध धर्मात : 

बौद्ध धर्मामध्ये आखाजी या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते. बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे औचित्य आहे.

२)जैन धर्मात : 

भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणासाठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top